Wednesday, January 12, 2011

मरणाचे भय कसले?



कित्येकांना मरणाचे भय असतेच! का कोणास ठाऊक पण असतेच! त्यावरच लिहिलेली कविता!

अरे मरणाचे भय कसले?
भ्याड आपण नाही,
अरे शिवरायांच्या भूमित जन्मलो
भिती रक्तातच नाही!

कितीही भ्यालात तरी
मरण हे येणारच आहे,
का विचार उद्याचा
आजचा दिवस तुमचाच आहे!

रिकमा आलास रिकामाच जाणार
हेच सत्य बाळग मनाशी
मेल्यावरही अमर राहू,
निःश्चय करू स्वतःशी

कितीही संकटे येवोत
ईमान सोडणार नाही,
अरे मरणाचे भय कसले?
भ्याड आपण नाही!
- अद्वैत

No comments:

Post a Comment

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...