आत्ता पर्यंत या सरकारने कित्येकवेळा सामान्य माणसाच्या भावना दुखावल्या आहेत. घोटाळ्यांची तर यादीच निघेल. तरिदेखिल निर्लज्जपणे सगळ चालू आहे! २जी घोटाळा काय नी कॉमनवेल्थ घोटाळा काय, या घोटाळ्यात खाल्लेले पैसे जर चांगल्या कामासाठी वापरले गेले असते तर निश्चितच काहितरी नक्कीच साध्य झालं असतं. इकडे रामदेवबाबा "काळा पैसा आणा, काळा पैसा आणा" म्हणून ओरडत आहेत पण ह्या घोटाळ्यातल्या पैश्याबद्दल कोणीच काही बोलत नाहिये! मान्य की लोक पकडले, कारवाई सुरू आहे, वगैरे वगैरे पण ते पैसे गेले कुठे???
असो, याच विषयावर मी आज पहिलं मोठे व्यंगचित्र काढले आहे. "मॅडम का ढाबा". साहजिकच यात कोणाला उद्देशुन काढले आहे ते समजले असेलच! :)
तर आपले स्वागत हे "मॅडम का ढाबा" मध्ये. आजचे मेन्यू: २जी घोटाळा, CWG घोटाळा, आदर्श आमटी, कलमाडी फ्राय, इत्यादी बरेच काही. आणि हो, सगळे विषय भट्टीत इतके खरपूस भाजले आहेत की चव नक्कीच आवडेल! :D
 |
| या आधी मी बरिच व्यंगचित्र काढली पण अगदी छोटी, टाईमपासवाली, पण हे माझं पहिलं मोठं व्यंगचित्र! तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कळवा! :) |